अंघोळ न करता स्वयंपाक बनवत असाल तर महिलांनी नक्की वाचा, तुम्ही विचारही केला नसेल अशा गोष्टी घडतात...

अंघोळ न करता स्वयंपाक बनवत असाल तर महिलांनी नक्की वाचा, तुम्ही विचारही केला नसेल अशा गोष्टी घडतात…

मित्रांनो स्वयंपाक घर हे एक मंदिर आहे. म्हणून आपण मंदिर जस स्वच्छ व शुद्ध ठेवतो त्याच प्रमाणे आपले स्वयंपाक घर सुध्दा स्वच्छ व सुंदर ठेवावे. कारण स्वयंपाक घरातच देवी अन्नपूर्णा वास्तव करते. जर आपण स्वयंपाक घर स्वच्छ ठेवले त्याचे पावित्र्य राखले तरच देवी अन्नपूर्णा तिथे थांबते. नाहीतर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते. ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णाचा वास असतो अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही.

अशा घरात नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली तर आपल्या घरात बरकत राहत नाही. आपल्याला अन्नपाण्यासाठी सुद्धा तरसावे लागते. म्हणून देवी अन्नपूर्णाचा नेहमी आदर करा आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपले स्वयंपाक घर स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र ठेवतो. काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते.

मग त्या स्नान न करता तश्याच स्वयंपाक घरात जातात आणि चहा बनवतात. परंतु या मुळे घरात अशुद्धी पसरते. अंघोळ न करता तुम्ही जे जेवण आपल्या पतीला मुलांना देता ते खाऊन ते सुद्धा अशुद्ध बनतात. त्यामुळे घरात दारिद्र्य यायला सुरुवात होते. म्हणून स्वयंपाक करण्यापूर्वी सर्वात आधी स्नान करावे. स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावे. गॅसची शेगडी स्वच्छ करावी. देवी अन्नपूर्णा ला नमस्कार करून त्यानंतरच गॅस चालू करावा.

आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आम्ही तर तरी स्वयंपाक घर स्वच्छ केले होते, मग सकाळी कशासाठी स्वच्छ करायचे. परंतु रात्री 11 ते 3 पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते. ती नकारात्मकता आपल्या स्वयंपाक घरामध्ये सुद्धा असते. जी आपल्या गॅसवर गॅसच्या शेगडीवर ही पसरलेली असते. ती नकारात्मक काढून टाकण्यासाठी सर्वात आधी स्वयंपाक घराची सफाई करावी आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरवात करावी. तसेच अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे आपण म्हणतो. हे अन्न म्हणजे भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो. म्हणून हे अन्न करण्याआधी अंघोळ करून शुद्ध वातावरणात केला तर त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात.

काही स्त्रियाना रात्रीचे उष्टे खरकटे भांडे स्वयंपाक घरात जमा करून ठेवण्याची सवय असते. त्या सकाळी उठल्या की मग त्या भांडी स्वच्छ करतात. परंतु हे खूप चुकीचे आहे. उष्टे खरकटे भांडे कधीही स्वयंपाक घरात तसेच पडू देऊ नये. कारण यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. उष्ट्या खरकट्या भांड्यावर लगेचच जीवजंतू निर्माण होतात. ते आपल्या स्वयंपाक घराचे वातावरण दुषित करतात. पर्यायाने त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून तरी झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडी स्वच्छ करून स्वयंपाक घराची व्यवस्थित स्वच्छता करावी. स्वयंपाक झाला की सर्वात आधी भगवंतांना नेवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच आपण जेवण करावे. माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा.

About admin

Check Also

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मित्रांनो उद्या शुक्रवार माता लक्ष्मीचा वार. उद्या दिनांक 31 वर्षातील शेवटचा दिवस. हा दिवशी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *