आपले केस आपल्या सौंदर्याचा एक अविभाज्य घटक आहे परंतु सध्याच्या ताण-तणावाच्या परिस्थितीमुळे आपल्यापैकी अनेक जण केस गळती, केसांमध्ये कोंडा असणे, केसांची वाढ न होणे, केस गळणे, केसांमध्ये दोन तोंड येणे,अकाली केसांमध्ये पांढरेपण येणे यासारखे अनेक समस्या उद्भवत असतात.सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यक्त झालेला आहे आणि अशा वेळी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा अनेकदा मनुष्याला शक्य होत नाही आणि परिणामी आपल्या केसांकडे सुद्धा दुर्लक्ष होत असतेn म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी केसांचे आरोग्य चांगले राहील या अनुषंगाने एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
या माहितीमध्ये आपण जे काही उपाय करणार आहोत ते अगदी साधे सोपे व घरगुती आहेत तसेच आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचे मानले गेले आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या केसांच्या संदर्भातील सर्व स’मस्या मुळापासून न’ष्ट होण्यासाठी मदत होणार आहे चला तर मग जाणून घ्याव्यात त्याबद्दल…अनेकदा केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे यासाठी आपण वापरलेले रासायनिक पदार्थ सुद्धा कारणीभूत ठरतात.
हे पदार्थ वापरलेले केस लवकर काळे होतात हे जरी खरे असले तरी सगळ्यात लवकर गळू सुद्धा लागतात परंतु त्या पदार्थांमध्ये रासायनिक द्रव्ये उपलब्ध असल्याने त्याचा नंतर आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होताना दिसून येतो म्हणून आजच्या लेखामध्ये आपण आयुर्वेद शा’स्त्रातील काही महत्त्वाचे पदार्थ वापरणार आहोत.त्यातील पहिला पदार्थ म्हणजे कढीपत्ता ची पाने. कडीपत्ता चे पाने आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात तसेच या पानांमध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या केसांमधील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर निघण्यासाठी मदत होते. कढीपत्ता मध्ये असे काही पोषक घटक तत्व असतात तसेच की विटामिन्स,बीटाकॅरेटिन, ऍसिड या सर्वांमध्ये आपल्या केस गळतीचे प्रमाण कमी होते. त्यानंतर आपल्याला कडूलिंबाची पाने घ्यायचे आहे.
कडूलिंबाच्या पानांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या पानांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक स’मस्या दूर होतात त्याच बरोबर आपल्या केसांच्या मुळाशी जे काही विषारी घटक बसलेले असतात व जर काही बुरशीजन्य पदार्थ असतील किंवा काही आजार होण्याची शक्यता असतील तर ते सर्व न’ष्ट करण्याची शक्ती कडुलिंबाच्या पानांमध्ये असते त्याचबरोबर या पानांमध्ये अँ’टीबॅक्टरियल व फंगल इ’न्फेक्शन दूर करण्याची शक्ती असते.
ही पाने चवीने व गुणधर्माने जरी कडू असले तरी आपल्याला फायदे मात्र चांगले प्रदान करत असते. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी खोबरेल तेल लागणार आहे. जर तुमच्याकडे तिळाचे तेल असेल असेल तरी उत्तम बदामाचं तेल असेल तरी चालेल ,खोबरेल तेलामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या केसांना वाढ लागते तसेच यामुळे केसांना चमक सुद्धा येते.आपल्याला कडूलिंबाची पाने आणि कडीपत्ता समप्रमाणात मध्ये घ्यायचे आहेत चहा पत्ती ची पावडर घ्यायची आहे. आपल्या सर्वांच्या घरी चहा पत्ती ची पावडर असते चहा पत्ती मध्ये विटामिन्स सी, विटामिन्स ई भरपूर प्रमाणामध्ये असते आणि यामुळे आपल्या केसांना रंग प्राप्त होतो.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याच्या आधारे चहा पत्तीची बारीक पावडर करायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लवंग सुद्धा लागणार आहे. आपल्या केसांची वाढ होण्यासाठी आपल्याला महत्त्वाची ठरते आता आपल्याला एका कढईमध्ये खोबरेल तेल टाकायचे आहे आणि त्यामध्ये कडुलिंबाची पाने व कढीपत्त्याची पाने टाकून हे मिश्रण चांगले गरम करून घ्यायचे आहे व त्यात चहा पत्तीची पावडर व लवंग सुद्धा मिक्स करायचे आहे आता हे मिश्रण आपल्याला छान पद्धतीने गरम होऊ द्यायचे आहे जेणेकरून तेलामध्ये या सर्व पदार्थांचा अर्क उतरू शकेल.
अशा प्रकारचे तेल तुम्ही बनवून ठेवू शकता जर आपण हे तेल एक दोन महिने सुद्धा बनू शकतो.हे तेल खराब होत नाही तसेच हे तेल लावल्याने आपल्या केसांना पोषक तत्व प्राप्त होतात व परिणामी केस गळती सुद्धा बंद होऊन जाते. आपले केस नैसर्गिक दृष्ट्या चमकू लागतात. केसांना काळा रंग प्राप्त होतो. आता आपण गाळणीच्या सहाय्याने हे तेल एका काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवू शकतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण हे तेल लावू शकतो असे आठवड्यातून तीन दिवस जरी केले तरी आपल्या केसांना मजबुती प्रदान होईल व आपले केस नेहमी चांगले राहतील म्हणून केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हा उपाय अवश्य करा.